श्री अज्ञानसिद्ध

       श्रीहेग्रसास अहिल्या नावाची एक मुलगी होती.ती मसूर गांवी दिली होती.तिला 3 मुले होती(श्रीअज्ञानसिद्ध, श्रीविदेहसिद्ध व श्रीनरेंद्रसिद्ध).अहिल्याने पुत्र प्राप्तीसाठी श्रीनागनाथास नवस केला होता, तेव्हा श्रीनागनाथांच्या कृपेनेच श्रीअज्ञानसिद्धांचा जन्म झाला होता. बालपणापासून हे अत्यंत विरक्त होते.यावेळी श्रीनागनाथ गुप्त झाले होते.श्रीअज्ञानसिद्ध हे महायोगी होते. व श्रीनागनाथांवर त्यांचे नि:सीम प्रेम होते, पुढे गुर्वाज्ञेवरून यांना नरंदे येथे जावे लागले व तेथेच त्यांनी माघ शुद्ध पंचमीला जिवंत समाधी घेतली. यांनी संकटहरणी, नागेश माहात्म्य, पंचीकरण प्रमेय, काळज्ञान, वरद नागेश, देवकी माहात्म्य, सप्तकोटेश माहात्म्य, स्वरूप निर्वाण, श्रीगुरुसाम्राज्य, जीवब्रम्हाभेदलक्षण, अकळकांड, पृच्छापत्र इतर स्फुट काव्ये, तसेच अभंग, साकी, आरती, फाकी असे विपुल ग्रंथ रचना केली, याची वाणी प्रासादिक असून अभंगाचा विषय अध्यात्मपर अथवा उपदेशपर आहे.